Sunday, July 11, 2010

वक्त से पेहेले और नसीब से ज्यादा किसी को कुछ नही मिलता असं ऎकलं होतं पण काही दिवसांपूर्वी याचा प्रत्यय आला.
काही दिवसांपासून एक रियालीटी शो व्यवस्थित follow करतेय.. DID Li'l Masters नावाचा..काही दिवसांपूर्वी त्यामधून वत्सल विटलानी नावाचा अत्यंत गुणी डान्सर बाहेर पडला कारण त्या दिवशीचा त्याचा performance इतरांच्या तुलनेत कमी पडला. जय नायरची ४ जणांची अनेक दिवसांपासूनची अबाधित टीम त्यामुळे कमी झाली. सगळेच हळहळले.
अमॄता नावाच्या एका स्किपर चे एका मागोमाग एक ३ स्पर्धक स्पर्धेतुन बाद झाले..पुन्हा सगळे हळहळले. आता अमॄताकडे उरली होती ती फक्त खुशबू कलगुटकर ही जबरदस्त डान्सर आणि अमॄताचं या स्पर्धेतलं भवितव्य पूर्णत: खुशबूवर अवलंबून होतं. मध्यंतरी याच स्पर्धेत call back एपिसोड झाला पण त्याचाही जय आणि अमॄताला काहीच फायदा झाला नाही कारण त्यातून ना वत्सल पुन्हा आत आला आणि ना अमॄताच्या टीम मध्ये कोणी वाढलं..पुढे call back एपिसोड मध्ये आत आलेले दोघेही जण स्पर्धेतून बाद झाले पण एक खुपंच दुख:द घट्ना घडली ती म्हणजे स्किपर अमॄताच्या खुशबूचा रिहर्सल्स च्या वेळी अपघात झाला आणि तिचा हात फ़्रेक्चर झाला आता मात्र अमॄताच्या bad luckची हद्द झाली..आणि मग बराच उहापोह झाल्यानंतर वत्सलला पुन्हा स्पर्धेत घेण्यात आलंय पण या वेळी त्याला स्किपर अमॄताच्या टीम मधून नाचावं लागतंय.
खुशबू सारखी अत्यंत सुंदर डान्सर आज स्पर्धेत एवडःया दूरवर येउनही त्या स्टेज वर नाचू शकंत नाहीए आणि वत्सल ज्याला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं तो त्याच्या ओरिजनल स्किपर जय नायरच्या सोबत नाही तर समोर उभा राहिलाय. या सर्वावर कळस म्हणूनच की काय वत्सलच्या performance मुळे अमॄताला काल Skipper of the day किताब मिळाला..मला खरंच आश्चर्य वाटतं वत्सलच्या नशीबाचं आणि नशीबावरचा विश्वास आणखीनच द्रुढ होतोय..शेवटी आपल्यापाशी येते जे आपले असते, ही ओळ खरी ठरली असं वाटलं .

1 comment: